Posts

Showing posts from August, 2017

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण

Image
(केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी माध्यमांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचे भाषण दूरदर्शन व आकाशवाणीवरून प्रसारित करायला दिलेला नकार म्हणजे सरकारी दडपशाही आणि हुकुमशाहीची नांदीच आहे. सरकारने जरी हे भाषण प्रसारित करण्यावर बंदी घातली तरी सामाजिक माध्यमांनी या भाषणाला खूपच उचलून धरले. जीवनमार्गच्या वाचकांसाठी त्याचे भाषांतर आम्ही सादर करीत आहोत.) प्रिय त्रिपुरावासी, स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. स्वातंत्र्य संग्रामातील महान शहिदांच्या स्मृतींना मी आदरांजली वाहत आहे. आज आपल्यामध्ये असलेल्या स्वातंत्र्या सैनिकांनाही मी विनम्रतेने अभिवादन करीत आहे. स्वातंत्र्यदिन हा केवळ एक समारंभ साजरा करण्याचा प्रसंग नाही. भारतीयांचे या दिवसाशी असलेले भावनिक संबंध आणि त्याचे ऐतिहासिक महत्व पाहता, एक राष्ट्रीय आत्मपरिक्षणाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे.         या स्वातंत्र्यदिनी आपल्यासमोर बरेच समयोचित, महत्वाचे समकालीन मुद्दे आहेत. विविधतेतील एकता हा भारताचा पारंपारिक वारसा आहे. धर्मनिरपेक्षतेसा